गोंदिया, दि.२८: राज्य
शासनाच्या महत्त्वाकांक्षी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६” अंतर्गत गोंदिया
जिल्ह्यातील कामकाजाला वेग आला असून, पोर्टलवरील ताज्या आकडेवारीनुसार मोठ्या
प्रमाणात शेतकऱ्यांची नोंदणी व पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्यात एकूण २०,९१५
कर्ज खाते अपलोड करण्यात आले असून, त्यापैकी १८,८३० शेतकरी पात्र ठरले आहेत.
यामध्ये ८,७२३ शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून, अजूनही १०,१०७ शेतकऱ्यांचे
ई-केवायसी प्रलंबित आहे.
प्रशासनाच्या वतीने
शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत मिळवण्यासाठी
त्यांनी तातडीने आपले आधार प्रमाणीकरण (E-KYC) पूर्ण करावे. ई-केवायसी पूर्ण न
केल्यास लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
दरम्यान, जिल्हा प्रशासन व
संबंधित यंत्रणा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत
असून, प्रलंबित प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
0000000
No comments:
Post a Comment