कर्जमुक्ती योजनेत ई-केवायसीला वेग; 61.58% प्रमाणीकरण
पूर्ण
गोंदिया, दि. 29 : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यात ई-केवायसी (e-KYC)
प्रक्रियेला वेग मिळत असून आतापर्यंत 61.58 टक्के प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. 29
जुलैपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, एकूण
20,915 कर्जखाते अपलोड करण्यात आली असून त्यापैकी 18,830 शेतकरी पात्र ठरले आहेत.
यापैकी 11,597 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून उर्वरित 7,233 प्रकरणे
प्रलंबित आहेत.
प्रशासनाकडून ई-केवायसी
प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी सातत्याने जनजागृती व पाठपुरावा सुरू आहे.
उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यास कर्जमुक्तीचा लाभ
लवकर मिळू शकणार आहे.
जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना
आवाहन केले आहे की, प्रलंबित असलेले ई-केवायसी त्वरित पूर्ण करून शासनाच्या या
महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा.
00000
