गोंदिया, दि.4: महाराष्ट्र शासनाच्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत गोंदिया
जिल्ह्यात सकारात्मक प्रगती होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सहकारी बँका
व राष्ट्रीयकृत बँकांच्या समन्वयातून कर्जमाफी प्रक्रियेला चांगली गती मिळत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार,
जिल्ह्यात ३०,२९५ कर्जखाती यशस्वीपणे अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी २१,६१६
शेतकरी पात्र ठरले असून, त्यातील १६,०४७ शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे.
उर्वरित ५५६९ प्रकरणांवर वेगाने कार्यवाही सुरू असून लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण
होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासन व बँकांच्या
संयुक्त प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळवून देण्यास मदत होत
असून, उर्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोहीम अधिक वेगाने राबविण्यात
येत आहे.
दरम्यान, कर्जमाफीचा लाभ थेट
खात्यात जमा होण्यासाठी प्रलंबित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणिकरण
(E-KYC) पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment