आतापर्यंत
50 लाख 38 हजार जणांना कर्जवाटप
देशातील
आर्थिक विषमता दूर करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेली मुद्रा बँक
योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेतून मागील दोन वर्षात 50 लाख 38 हजार जणांना कर्ज वाटप करण्यात आले
आहे,
अशी
माहिती वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यापुढील काळातही ही
योजना प्रभावीपणे राबवून बेरोजगारांचे जीवनमान बदलण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात
येतील,
असे
त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री
श्री. मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे
मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत
होते.
मंत्री
श्री. मुनगंटीवार म्हणाले, गोरगरिबांना विनातारण आणि विनाजामीन
कर्ज मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वाकांक्षी अशी मुद्रा बँक
योजना सुरू केली आहे. मागील साधारण दोन वर्षात राज्यात ही योजना प्रभावीपणे
राबविण्यात आली आहे. योजनेतून 2016 - 17 मध्ये 16.9 हजार कोटी रुपयांचे तर 2017 -
18 मध्ये आतापर्यंत 8.8 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 2016 - 17
मधे 33 लाख 44 हजार तर 2017 - 18 मधे आतापर्यंत 16 लाख 93 हजार इतक्या
बेरोजगारांना आपण या योजनेतून व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले आहे. यापुढील
काळातही मिशन मोडवर ही योजना राबवून जास्तीत जास्त बेरोजगारांना कर्ज आणि कोशल्य
विकास प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी यावेळी
सांगितले.
मंत्री
श्री. मुनगंटीवार म्हणाले, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त
लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी. याबरोबरच
फक्त कर्ज वितरण न करता लाभार्थ्याला कौशल्य विकास प्रशिक्षणही देण्यात यावे, त्यामुळे
मिळालेले कर्जाचे पैसे त्याला योग्य पद्धतीने वापरता येतील. प्रशिक्षण, कार्यशाळा
आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावरही भर देण्यात यावा, अशा सूचना
त्यांनी यावेळी केल्या.
मागील दोन
वर्षांच्या काळात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक तर नंदुरबार आणि गडचिरोली जिल्ह्यात कमी
कर्जवाटप झाल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर योजनेचा
उद्देशच आर्थिक विषमता दूर करणे हा आहे, त्यामुळे राज्यातील
विशेषतः मागास जिल्ह्यातही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना
मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.
नोकरी
मागणाऱ्या हातापेक्षा नोकरी देणाऱ्या हातांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. या
धोरणातूनच पुढे आलेल्या या योजनेला अधिक प्रभावी करण्यासाठी त्याची कौशल्य विकास
विभाग,
स्टार्टअप
योजना,
बचतगट
विषयक विविध योजना यांच्याशी सांगड घालून पुढील आर्थिक वर्षातही ही योजना
प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी
म्हणाले.
बैठकीस
आमदार अनिल सोले, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन, नियोजन
विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, कौशल्य
विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, आयटी सचिव श्रीनिवासन, एसएलबीसीचे
समन्वयक श्री. मस्के, ग्रामीण जिवनोन्नती कार्यक्रमाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.
विमला यांच्यासह मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे विविध सदस्य आदी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment