• जिल्हाधिकाऱ्यांनी दिली राष्ट्रीय एकतेची
शपथ
• एकदा दौडमध्ये अनेकांचा सहभाग
देशाचे
पहिले गृहमंत्री दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर हा दिवस
राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात यानिमित्ताने
आयोजित कार्यक्रमात माँ बम्लेश्वरी देवस्थान ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान
एकता दौड आयोजित करण्यात आली. या दौडला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी हिरवी
झेंडी दाखविली. दौडमध्ये जिल्हाधिकारी काळे यांचेसह जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी
रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज
प्रामुख्याने सहभागी झाले.
एकता दौड जिल्हाधिकारी कार्यालयात
पोहोचल्यानंतर मान्यवरांनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान
दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन
पुष्पहार अर्पण केले. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांनी सरदार वल्लभभाई
पटेल व इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी
उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी श्री.गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा अधीक्षक कृषि
अधिकारी अनिल इंगळे, जि.प.मुख्य वित्त व लेखाधिकारी श्री.मडावी, जिल्हा ग्रामीण
विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री.मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बागडे, श्री.राठोड, श्री.भांडारकर, लेखाधिकारी
श्री.बावीस्कर, कर्मचारी संघटनेचे लिलाधर पाथोडे, दुलीचंद बुध्दे, तुलसीदास झंझाड,
वैद्यकीय अधिकारी डॉ.चौरागडे, श्री.मेनन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी,
कर्मचारी तसेच पोलीस प्रशिक्षणार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment