जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 24 August 2016

वृक्षलागवड करुन त्याचे संगोपन करणे महत्वाचे - पालकमंत्री बडोले





         










वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यात 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लागवड अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. या कार्यक्रमाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. यातून जिल्ह्यातील नागरिकांनी पर्यावरण संतुलनासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड करुन त्याचे संगोपन करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       आज 24 ऑगस्ट रोजी अर्जुनी/मोरगाव येथील प्रसन्न सभागृहात आयोजित वाटचाल 50 कोटी वृक्ष लागवडीकडे कार्यक्रमात उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी होते. विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक राहूल पाटील व तुषार चव्हाण, अर्जुनी/मोर नगराध्यक्ष श्रीमती पोर्णिमा शहारे, जि.प.माजी सभापती उमाकांत ढेंगे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे प्रामुख्याने उपस्थित होते.
       पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘झाडे लावा झाडे जगवा’ याचा बोध प्रत्येकाने घेतला पाहिजे. वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम येथेच न थांबवता आणखी यापुढे मोठ्या संख्येने झाडे लावावी व त्याचे संगोपन करावे असे सांगितले. झाडाचे अनेक फायदे असल्यामुळे त्याची काळजी घेवून झाडे जगली पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
       जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, 2 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम फक्त शासनाचा उपक्रम नसून यामध्ये सर्व जनतेचा सहभाग होता. वृक्षलागवडीला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला. पुढच्या वर्षी देखील असेच वृक्षलागवड करुन अभियान यशस्वी करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
       डॉ.भुजबळ म्हणाले, वृक्ष लागवड अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले. या मोहिमेत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वृक्षलागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मनापासून सहभाग घेतला. एक रोल मॉडेल मोहीम कशी असावी हे या वृक्षलागवड मोहिमेतून सर्वांना दाखवून दिले आहे. या मोहिमेतून संपन्न आणि सुरक्षित महाराष्ट्र निर्माण होईल असेही त्यांनी सांगितले.
        याप्रसंगी 2 हेक्टर जागेवर रोपवन करुन पालकत्व स्विकारल्याबद्दल शिवप्रसाद सदानंद जायसवाल महाविद्यालय अर्जुनी/मोर, सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी/मोर व मानवता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बोंडगावदेवी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. वृक्षलागवडीचे औचित्य साधून तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. ग्रामपंचायत व संयुक्त व्यवस्थापन समितीने वृक्षलागवडीबाबत चांगले कार्य केल्याबद्दल आर.एन.झोळे, ए.आर.ठवरे, मंसाराम चचाणे, अशोक कापगते व संतोष मेश्राम यांचा तसेच सामाजिक संस्था समता सैनिक दल, तिबेटियन, पतंजली योगपीठ, कलभी यांचा, त्याचप्रमाणे वृक्षलागवडीबाबत वृत्तपत्रात व्यापक प्रसिध्दी दिल्याबद्दल अर्जुनी/मोर तालुका प्रतिनिधी लोकमतचे संतोष  बुकावन व अमरचंद ठवरे, तरुणभारत-सुरेंद्रकुमार ठवरे, हितवाद- ओमप्रकाशसिंह पवार, भास्कर-अश्विनसिंह गौतम, लोकमत समाचार-रामदास बोरकर, रक्षा टाईम्सचे कुलदीपसिंह राठोड यांचा, तसेच ठाणेदार एन.व्ही.बंडगर, उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, गटविकास अधिकारी एन.आर.जमईवार, शिक्षण विभागाचे आर.एम.चांडक, एस.जे.मेश्राम, जे.डी.पठाण, आय.एच.कासेवार, आर.एम.धकाते आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी.रहांगडाले, वनपाल बी.डी.दखने, वनरक्षक पी.के.लाडे, एम.एस.प्रधान, सिमा सूर्यवंशी व होमगार्ड आसाराम नागोसे यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व वृक्ष रोपटे देवून सत्कार करण्यात आला.

         कार्यक्रमास सहायक वनसंरक्षक व्ही.जी.उदापुरे व यु.टी.बिसेन, अर्जुनी/मोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य, वनरक्षक, वनपाल, अर्जुनी/मोर तालुका परिसरातील ग्रामस्थ, शिक्षक व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक परिविक्षाधीन उपवनसंरक्षक राहूल पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.काकडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.रहांगडाले यांनी मानले.

No comments:

Post a Comment