जिल्ह्यातील विविध घटकातील गरजु लाभार्थ्यांना शासनाच्या विविध
योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी
योग्य नियोजनातून योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आपला भर राहणार आहे. असे
प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज 15
ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय
ध्वजारोहण कार्यक्रम कारंजा पोलीस कवायत मैदान येथे झाला. यावेळी ध्वजारोहणानंतर
उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा
मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.शिक्षण व आरोग्य
समिती सभापती पी.जी.कटरे, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जिल्हाधिकारी डॉ.विजय
सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी
जयवंत पाडवी, नवेगाव नागझिरा वन्यजीव व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रविकिरण
गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री
बडोले पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त
राज्यातील 125 दलित वस्त्यांचा दोन वर्षात सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष योजना
कार्यान्वीत करण्यात येतील. सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सायबर लॅबचा
निश्चितच उपयोग होईल. ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही त्यांना शौचालय बांधण्यासाठी
प्रेरीत करण्यात येईल असे ते म्हणाले.
जिल्ह्यात
चालू हंगामात नैसर्गीक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति
क्विंटल 200 रुपये प्रोत्साहन राशी बोनस म्हणून देण्यात आल्याचे सांगून श्री.बडोले
म्हणाले, याचा लाभ जिल्ह्यातील 46 हजार 481 धान उत्पादक शेतकऱ्यांना झाला असून
त्यांना 30 कोटी 13 लक्ष रुपये बोनस म्हणून देण्यात आला आहे. आगामी महासमाधान
शिबिरात 40 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन असून जास्तीत
जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
गोंदिया
येथे यावर्षीपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्याची माहिती देवून
श्री.बडोले पुढे म्हणाले, 3 हजार 641 शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी मागील
वर्षी दिली असून यावर्षात जुलै अखैर 650 शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिले आहे.
त्यामुळे त्यांना आता दुबार व तिबार पिके घेता येणार आहे. जिल्ह्यातील मजुरांना
रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महत्वाची ठरली असून यावर्षात जुलै अखेर 1 लाख
6 हजार 322 कुटुंबांना रोजगार देण्यात आला आहे. मजुरांना रोजगार उपलब्ध करुन
देण्यात गोंदिया जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त
शिवार अभियानाच्या माध्यमातून 15 हजार 412 हेक्टर सिंचन क्षेत्र वाढल्याचे सांगून
श्री.बडोले म्हणाले, त्यामुळे पिकांची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत झाली आहे.
वनालगतच्या गावातील 11 हजार 501 कुटुंबांना गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.
कायापालट प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य संस्था सुसज्ज होत आहे.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करुन जास्तीत जास्त पर्यटक येण्यासोबतच स्थानिकांना
जास्तीत जास्त रोजगार निर्माण कसा होईल या दृष्टीने आपले नियोजन असल्याचे त्यांनी
सांगितले. यावेळी
पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी
परेडचे निरीक्षण केले. पोलीस पथक, शीघ्र कृती दल, होमगार्ड पथक, स्काऊट- गाईड पथक,
बँड पथक, बिट मार्शल पथक, निर्भया पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक यांनी संचलन
केले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या
अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांचा सत्कार केला. यावेळी अपर
जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय
केवलीया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण
महिरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदीप बडगे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी विकास ठाकरे, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, श्री.बागडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव
फुलेकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष
गांगरेड्डीवार, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज यांचेसह विविध
विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार बांधव, ज्येष्ठ
नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व
उपस्थितांचे आभार मंजुश्री देशपांडे यांनी मानले.
उत्कृष्ट
कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
यावेळी
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी,
विद्यार्थी यांचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र
व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये
सन 2014-15 या वर्षात महसूल विभागात विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगीरी
केलेल्या तुमसर येथील तत्कालीन नायब तहसिलदार तथा विद्यमान गोंदिया तहसिलदार
अरविंद हिंगे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून संजय धार्मिक, तिरोडा
तालुक्यातील बेलाटी येथील पोलीस पाटील श्री.रिनाईत, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन
2015-16 मध्ये हागणदारी मुक्त घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत सरपंच व सचिव
यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आमगाव तालुक्यातील गोसाईटोला येथील सरपंच
प्रभाबाई शिवबंशी, सचिव डी.के.महाकाळकर, सालेकसा तालुक्यातील रोंधा ग्रामपंचायत
सरपंच मिलावतीबाई लिल्हारे, सचिव एन.जी.राठोड, बिंझलीच्या सरपंच सुलोचना लिल्हारे,
सचिव जी.सी.भुमके, अर्जुनी/मोर. तालुक्यातील तुकमनारायण, ग्रामपंचायतचे सरपंच
दयाराम शहारे, सचिव एस.एस.मेंढे, सोमलपुरचे सरपंच आशा हातझाडे, सचिव
वाय.सी.डोंगरे, तिरोडा तालुक्यातील सालेबर्डीचे सरपंच विनोद लिल्हारे, सचिव गणेश
कापगते, मनोरा ग्रामपंचायतच्या सरपंच लताबाई पेशने, सचिव एस.डी.उईके यांचा तर
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्ह्यातील युवकांनी समाजहितासाठी केलेल्या
कार्याचा गौरव म्हणून जिल्हास्तरीय युवा पुरस्कार ब्रम्हानंद सांस्कृतिक अकादमी
गोंदिया, कपील बिसेन, सीमा रहांगडाले यांना गौरविण्यात आले.
माझी
कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील हर्षा भेदे,
गोरेगाव तालुक्यातील हिरापूर येथील स्वरांगी नेवाने यांना प्रशस्तीपत्र, आरोग्य
विभागात सन 2015-16 या वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यामध्ये सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.सी.वानखेडे
यांनी सर्वाधिक कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याबद्दल, प्राथमिक आरोग्य केंद्र
खमारीच्या आरोग्य सेविका कुसूम लांजेवार, कुंदा गजभिये, आशा कार्यकर्ती म्हणून
प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगावच्या रेखा पटले. गोंदिया भारत स्काऊट आणि गाईडच्या
वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुवर्णा बाण चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुरुकृपा आदिवासी
आश्रम शाळा ठाणा येथील कब मुले शिवांक उईक, अविनाश मडावी, हिरालाल वरखडे, गुरुनानक
वरिष्ठ प्राथमिक शाळा गोंदियाच्या बुलबुल मुली अश्वीनी नंदागवळी, सांची रंगारी,
राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार जीईएस हायस्कूल दासगावचे भगीरथ जिवानी,
गुरुनानक वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मंजुषा देशपांडे, सामाजिक वनीकरण विभागामार्फत
राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत निवड केलेल्या 2 कोटी वृक्ष लागवड आणि त्याचे
होणारे चांगले परिणाम या विषयावरील निबंध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या प्राथमिक गटातील जानवी वैद्य- प्रथम, करिश्मा कारडा-
द्वितीय, हर्षल डोंगरे- तृतीय. माध्यमिक गटातील गीतांजली पोहरे- प्रथम, हेमाश्री
तुरकर- द्वितीय, कुशल बिसेन- तृतीय यांचा प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह
देवून सत्कार करण्यात आला. तसेच चोरट्याला पकडून देणाऱ्या महिला पोलीस गुनेश्वरी
भांडारकर सोनवाने यांना रोख 5 हजार रुपये बक्षीस देवून पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत
करण्यात आले.
No comments:
Post a Comment