जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 5 October 2019

निवडणूक निरीक्षकांकडून निवडणूक तयारीचा आढावा




      जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघाकरीता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या सामान्य निवडणूक निरीक्षक आणि पोलीस निवडणूक निरीक्षक यांनी 4 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हयातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, सामान्य निवडणूक निरीक्षक सर्वश्री मंजूर अली(अर्जुनी/मोरगाव), श्री राजीव मेहता (तिरोडा), श्री शौकत अहमद प्यारे(गोंदिया), श्री धनंजयसिंग भदोरीया (आमगाव), पोलीस निवडणूक निरीक्षक श्री धर्मवीर(अर्जुनी/मोरगाव), श्री सूधीरकुमार पोरीका(तिरोडा), श्री जी. जी. पांडे (गोंदिया), श्री टी. ईक्का (आमगाव), गोंदिया जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        आढावा सभेत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी सांगितले की, मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट आणि छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव जिल्हयाला लागून गोंदिया जिल्हयाची सीमा आहे. जिल्हयातील आमगांव आणि अर्जुनी/मोरगाव हे विधानसभा मतदासंघ नक्षल प्रभावित आहे. या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 या दरम्यानची आहे. तर गोंदिया आणि तिरोडा या मतदारसंघातील मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 या दरम्यान आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
         18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांनी मतदानासाठी यावे यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यात येत असल्याचे सांगून डॉ. बलकवडे यावेळी म्हणाल्या, मतदार जागृतीसाठी जिल्हयात 103 ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनीट वापरण्यात येत आहे. मतदान केंद्राची माहिती मतदान केंद्रावर असलेल्या सुविधा, निवडणूक प्रक्रीयेसाठी असलेले मनुष्यबळ, वाहनांची उपलब्धता, सीव्हीजीलवर प्राप्त तक्रारी तसेच जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात 10 लक्ष 96 हजार 441 मतदार आपला मतदानाचा हक्क 1282 मतदान केंद्रावरुन बजावणार आहे.        
        निवडणूक निरीक्षक यांनी यावेळी सूचविले की, मागील निवडणूकीत ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे. त्या ठिकाणी मतदार जागृतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवावे त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्यास मदत होईल.  ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे त्याची कारणे शोधून जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी पुढाकार घ्यावा. उमेदवाराच्या प्रत्येक बातमीवर लक्ष असावे. ते प्रचारासाठी वापरणार असलेल्या ध्वनीचित्रफित, बल्क एसएमएस, जाहिराती याबाबतची पूर्व परवानगी घेवूनच त्यांचे प्रसारण करावे असे सांगितले. 1950 तक्रार नंबरवर प्राप्त तक्रारीची माहिती घेतली. मोबाईल कवरेज एरीया जिल्हयात कोणत्या क्षेत्रात नाही याबाबतची देखील त्यांनी माहिती घेतली.
            सभेला उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, स्वीपचे नोडल अधिकारी एस.ई.ए. हाश्मी, पोलीस उपअधीक्षक(गृह) सोनाली कदम, खर्च विषयक बाबीचे नोडल अधिकारी विकास राऊळकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री जाधव, उपजिल्हाधिकारी राहूल खांदेभराड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री तांबे, सीव्हीजीलच्या नोडल अधिकारी प्रणती बुलकुंडे  यांचेसह अन्य नोडल अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सादरीकरणाद्वारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री चौधरी यांनी निवडणूक तयारीची अन्य माहिती दिली.
                                                       000000000000



No comments:

Post a Comment