सडक/अर्जुनी येथील न्यायालयाच्या नविन इमारतीचे
उद्घाटन
भारतीय राज्यघटना ही भारतीयांसाठी एक
महत्वाचा दस्ताऐवज आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही व्यवस्था
अस्तित्वात आली आहे. लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून न्यायपालिका ही नि:पक्षपणे
न्याय देण्याचे काम करते. मार्ग काढला तर
निश्चितच मार्ग निघतो. पक्षकारांना केंद्रबिंदू मानून त्यांना योग्य न्याय मिळवून
देवून न्यायव्यवस्थेला प्रगतीपथावर न्यावे. असे प्रतिपादन मुंबई
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती
मुरलीधर
गिरटकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख
जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने हे होते. यावेळी सडक/अर्जुनीचे नगराध्यक्ष
देवचंद तरोणे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, जिल्हा न्यायाधीश-1 एस.बी.पराते, जिल्हा
न्यायाधीश-2 अमित जोशी, भंडाऱ्याचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.खुणे व
श्रीमती शर्मा, सह दिवाणी न्यायाधीश गोंदिया एन.आर.वानखडे, जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे, मुख्य न्यायदंडाधिकारी गोंदिया एन.जी.देशपांडे, सहायक
संचालक सरकारी अभियोक्ता चंदन रणदिवे, गोंदिया जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.
टी.बी.कटरे, वकील संघाचे सचिव ॲड.सचिन बोरकर, सडक/अर्जुनी वकील संघाचे सचिव
डी.एस.बंसोड तसेच ॲड. एस.बी.गिऱ्हेपुंजे, ॲड.गहाणे, ॲड.रहांगडाले, ॲड.अनमोल राऊत,
ॲड.पोर्णिमा रंगारी, सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.गाणार, उपअभियंता
श्री.लांजेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
न्या.गिरटकर
पुढे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात न्यायालयाची स्वतंत्र इमारत
तयार व्हावी यासाठी सतत पाठपुरावा करुन प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्व
तालुक्यामध्ये सुसज्ज अशी न्यायालयाची इमारत तयार झालेली आहे. देवरी तालुका
न्यायालयाच्या इमारतीसाठी काही प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या अडचणी
सुध्दा आता दूर झाल्यामुळे देवरी येथील न्यायालयाच्या इमारत बांधकामाला लवकरच
सुरुवात होणार आहे असे त्यांनी सांगितले.
गोंदिया व भंडारा येथील वकीलांमध्ये जागरुकता
आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य समजून
पक्षकारांना पारदर्शकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्याच्या
न्यायव्यवस्थेतील काही अडचणी असल्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी समन्वयाचा
मार्ग काढून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करावा असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन न्यायाधीश
सुहास माने म्हणाले, तालुका न्यायालयाची इमारत ही याअगोदर भाड्याच्या इमारतीत
होती. सन 2016 मध्ये या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली व 2019 मध्ये
ही इमारत पूर्णत्वास आली. आता या सुसज्ज अशा न्यायालयाच्या नविन इमारतीत
न्यायव्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी नेहमी सतकर्म करीत रहावे. प्रत्येक खटला हा लवकरात
लवकर कसा संपवता येईल याकडे लक्ष केंद्रीत करुन न्यायालयाचे पावित्र्य कायम ठेवावे.
यावेळी सडक/अर्जुनीचे दिवाणी न्यायाधीश एन.आर.ढोके यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त
केले.
यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांना स्मृतीचिन्ह
म्हणून भारताचे संविधान हा ग्रंथ भेट देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते यावेळी
वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सडक/अर्जुनी
तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र लंजे यांनी केले. सूत्रसंचालन साकोली
तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप कातोरे यांनी केले. उपस्थितांचे आभार देवरी
तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.पी.एन.संगीडवार यांनी मानले. कार्यक्रमास गोंदिया व
संलग्न तालुक्यातील सर्व न्यायाधीश, वकील मंडळी व सडक/अर्जुनी तालुका परिसरातील
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा
न्यायालयाचे प्रबंधक डी.एस.एकनाथे, अधीक्षक एस.सी.कान्हे, एम.आर.कटरे, महेंद्र
देशपांडे, कर्मचारी संघटनचे अध्यक्ष व्ही.पी.बेदरकर, सहायक अधीक्षक पी.डब्ल्यू
रणदिवे, वासुदेव रहिले, एस.डी.पारधी, महेंद्र पटले, श्री.बडवाईक, सडक/अर्जुनीचे
सहायक अधीक्षक श्री.कुकडे, नरेंद्र टेंभरे
व इतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment