जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 12 June 2020

मान्सून पुर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे

                                       गावपातळीवर गठित होणार आपत्ती व्यवस्थापन समिती


         जिल्हयातील धरण, जलाशये, तलाव, नद्या इत्यादी ठिकाणी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत अचानक पाऊस पडल्यास जिल्हयातील 87 गावांना पुराचा धोका नाकारता येत नाही. येणाऱ्या पुराच्या आपत्तीची तिव्रता कमी करण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपुर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात डॉ.बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सुन पुर्व तयारीचा आढावा  11 जून 2020 रोजी आयोजित सभेत घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.  सभेला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहा.जिल्हाधिकारी रोहन घुगे, सावन कुमार,अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांची् प्रामुख्याने उपस्थिती होती
डॉ. बलकवडे पुढे  म्हणाल्या की, आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी त्याचे सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. जलसंपदा व महसुल विभाग यांनी योग्य समन्वय साधुन काम करावे. जिल्हयातील रस्ते, जलाशये, जीर्ण इमारती, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतीची मान्सुनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तपासणी करुन वापरण्यास योग्य असल्यास तसा अहवाल सादर करावा.असे सांगितले.
पुर परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी तात्काळ  प्रतिसाद देणे, संबंधीत माहिती विचारुन दक्षता घेऊन शोध व बचावकार्य करण्याचे निर्देश देऊन डॉ. बलकवडे म्हणाल्या, पुर परिस्थीतीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कायमस्वरुपी हॅलीपॅड बांधण्या संबंधाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तसेच संबंधित तहसिलदारानी समन्वय ठेवून काम करावे. जिल्हयातील पर्यंटनस्थळे, धरण, जलाशये, तलाव तसेच धोक्याच्या ठिकाणी कुणीही सेल्फी घेतांना किंवा गर्दी करतांना आढळल्यास त्यांच्या विरुध्द योग्य कार्यवाही करावी.
डॉ.बलकवडे म्हणाल्या, पुर परिस्थीतीचा सामना करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय स्थापित करण्यासाठी  जिल्हयातील तालुका, नगर परिषद, नगर पंचायत, प्रभाग, वार्ड  आणि ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत तसेच गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करावी. जेणेकरुन पुर परिस्थीतीत ग्राम पातळीपर्यंत समन्वय साधला जाऊ शकेल तसेच पुर परिस्थीतीत जिवीत व वित्तीय हानीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.असे त्या म्हणाल्या. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करण्याचे निर्देश डॉ.बलकवडे यांनी दिले. उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार यांना पुर प्रवण 87 गावांचा सुक्ष्म आराखडा तयार करुन मान्सून कालावधीत सुरक्षित स्थळ (निवारा) चिन्हांकित करुन नियोजन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
 जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता यांना धरणाचे पाणी सोडण्यापुर्वी सर्व संबंधितांना सूचना देण्याबाबत, पोलिस विभागाला पाण्याखाली बुडालेले रस्ते, पुल या ठिकाणी बॅरीकेटींग लावून बंदोबस्त करण्याबाबत, पुरवठा विभागाला पुर प्रवण सर्व 87 गावात धान्याचा साठा उपलब्ध करण्याबाबत, विद्युत विभागाला मान्सून पुर्व विद्युत तारांवर झाडांच्या खांद्या कापणे, कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह यांना धोक्याचे ठिकाणात रेडीयमचे फलक लावण्याबाबत, आरोग्य विभागाला सर्व आरोग्य केन्द्रात औषधांचा पर्याप्त साठा व पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची माहिती सर्व ग्रामपंचायतीत लावण्याचे निर्देशही डॉ.बलकवडे यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व नगर परिषद , नगर पंचायत यांना नाले, नालींची स्वच्छता करुन जीर्ण इमारतीच्या मालकीच्या लोकांना नोटिस देण्याचे निर्देश डॉ.बलकवडे यांनी दिले. 
या सभेला उपविभागीय अधिकारी सर्वश्री रविंद्र राठोड (देवरी), गंगाधर तळपदे(तिरोडा),शिल्पा सोनाळे (अर्जुनी/मोरगाव), जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसिलदार सर्वश्री राजेश भांडारकर (गोंदिया) विनोद मेश्राम (अर्जुनी/मोरगाव) श्री.सी.जी. पित्तलवार(सालेकसा), प्रशांत घोरुडे(तिरोडा), डी.एस भोयर( आमगाव), विजय बोरुडे (देवरी),अपर तहसीलदार अनिल खडतकर,नायब तहसलिदार राजेश वाकचौरे, आर.एम खोकले,जिल्हा आपत्ती  व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे तसेच सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment