पालकमंत्री डॉ.
परिणय फुके यांच्या हस्ते 19 ऑगस्ट रोजी देवरी येथील आफताब मंगल कार्यालय येथे
इयत्ता पहिलीमध्ये
शिक्षण घेणाऱ्या 2343 विद्यार्थ्याना शालेय दप्तर वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी, आमदार संजय पुराम, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष हमीद अल्ताफ
अकबर अली, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, जि.प. समाजकल्याण समिती
सभापती विश्वजीत डोंगरे, देवरीच्या पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, देवरीच्या
नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे,जि.प. सदस्य उषा शहारे व माधूरी कुंभरे,शिक्षणाधिकारी
राजकुमार हिवारे, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबईचे सहायक व्यवस्थापक
हितेंद्र गांधी, इनोबल सोशल इनोव्हेशन मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग
भंडारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
राज्य नाविन्यता सोसायटीच्या
वतीने देवरी, सालेकसा व अर्जुनी/मोरगाव या आदिवासी बहूल तालुक्यातील जिल्हा
परिषदेच्या शाळेतील इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 2343 विद्यार्थ्यांना शालेय
दप्तर पुरविण्यात येणार आहे. यावेळी देवरी तालुक्यातील जि.प.च्या 12 प्राथमिक
शाळेतील 97 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वितरीत करण्यात आले. या दप्तराचे वजन 400
ग्राम असून त्याचे रुपांतर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटई, लिहीण्या व
वाचण्याकरीता डेस्क या दप्तरासोबत देण्यात आले आहे. पर्यावरण पुरक असे हे दप्तर
आहे. विद्यार्थ्यांना साबणाने हात धुण्यासाठी साबण ठेवण्याची व्यवस्थादेखील
करण्यात आली आहे. मुलांनी केलेला कचरा इतरत्र न टाकावा यासाठी दप्तरामध्ये छोटी
पिशवी सुध्दा आहे. या कार्यक्रमाला
गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, सर्व शिक्षा अभियानाचे श्री बिसेन, श्री ठोकने
यांचेसह विविध शाळांचा केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी त्यांचे
पालक तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
000000000000
No comments:
Post a Comment