-रोजगार विषयक
मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद
- गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
- समता प्रतिष्ठानचा उपक्रम
- गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
- समता प्रतिष्ठानचा उपक्रम
कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त
करण्यासाठी मेहनत, सातत्य व
योग्य नियोजनाची आवश्यकता असते. आपापल्या क्षेत्रात मोठ्या झालेल्या व्यक्ती आपण
पाहतो मात्र त्यांनी घेतलेली मेहनत व कष्ट आपल्याला माहित नसतात. करिअर साठी जे
क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्रात मेहनत व कष्टाने उच्च स्थान प्राप्त करा असे
प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन तेजस्विनी लॉन, सडक अर्जुनी येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन तेजस्विनी लॉन, सडक अर्जुनी येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
रोजगार शिबिराचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सभापती विश्वजित डोंगरे, अर्जुनी मोर पं.स. सभापती अरविंद शिवनकर, सडक अर्जूनी पं.स. सभापती गिरधर हत्तीमारे, राजेश राठोड़ (अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गोंदिया), प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण डॉ.
सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त
समाज कल्याण मंगेश वानखेडे, बाजार समिती
अर्जुनी मोरचे उपसभापती लायकराम भेंडारकर, माजी सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे तसेच इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून धनंजय वंजारी, निलेश रोहितकर, हेमंत सुटे, अश्विन कापसे, संदिप बडोले, विनय मानकर आदि तज्ज्ञ प्रामुख्याने उपस्थित
होते.
सामाजिक
न्याय विभागाने रोजगाराभिमुख अनेक योजना सुरू केल्या आहेत. या शिबिरात उपस्थित
मार्गदर्शक त्या विषयी आपणास सविस्तर माहिती देणार आहेत. या योजना समजून घ्याव्यात
तसेच त्याचा लाभ घ्या असे आवाहन ना. बडोले यांनी केले.
या शिबिरात तज्ञ
मार्गदर्शकाकडून रोजगारासंदर्भात मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील दहावी व बारावीमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राष्ट्राचे संविधान देऊन सत्कार करण्यात आला. तज्ञ मार्गदर्शकांनी इयत्ता बारावी, पदवी नंतर काय? यावर मार्गदर्शन करुन स्पर्धा परीक्षा, पायलट, एअर होस्टेस, केबिन क्रू, ग्राऊंड स्टाफ आदी प्रशिक्षण मार्गदर्शन, एम. फील, पी. एचडी फेलोशिप मार्गदर्शन, उद्योजकता विकास, समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, देश-विदेशातील उच्च शिक्षण, जात पडताळणी, शिष्यवृत्ती आदिंवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन बादल श्रीरामे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत वासनिक (समाज कल्याण निरीक्षक, नागपुर) यांनी केले.
00000
याप्रसंगी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील दहावी व बारावीमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राष्ट्राचे संविधान देऊन सत्कार करण्यात आला. तज्ञ मार्गदर्शकांनी इयत्ता बारावी, पदवी नंतर काय? यावर मार्गदर्शन करुन स्पर्धा परीक्षा, पायलट, एअर होस्टेस, केबिन क्रू, ग्राऊंड स्टाफ आदी प्रशिक्षण मार्गदर्शन, एम. फील, पी. एचडी फेलोशिप मार्गदर्शन, उद्योजकता विकास, समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, देश-विदेशातील उच्च शिक्षण, जात पडताळणी, शिष्यवृत्ती आदिंवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन बादल श्रीरामे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत वासनिक (समाज कल्याण निरीक्षक, नागपुर) यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment